शिरूर तालुक्यातील बेट भागात चोरट्यांचा धुमाकूळ : चार दिवसांत पाच रोहित्र फोडले; कवठे येमाईत भरदिवसा घरफोडी शिरूर, दि. १२ (अरुणकुमार मोटे) – शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलिस दूरक्षेत्राच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मलठण, कवठे येमाई आणि सविंदणे परिसरात अवघ्या चार दिवसांत पाच विद्युत रोहित्र फोडून त्यातील तांब्याच्या तारांची चोरी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे कवठे येमाई येथे भरदिवसा बंद घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीसह रोख रक्कम लंपास करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. मलठण येथील अष्टविनायक महामार्गालगत कॅनॉल रोडवरील विद्युत रोहित्र शुक्रवारी (दि. ६) मध्यरात्री फोडण्यात आले. चोरट्यांनी…
Author: Team Shirur Digital
शिरूर, दि. ०७ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती अंतर्गत विविध मतदान केंद्रांवर मंगळवारी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. कोणताही अनुचित प्रकार न घडता, पोलिसांच्या चोख बंदोबस्तात पार पडलेल्या या निवडणुकीत मतदारांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत लोकशाहीवरील आपला विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित केला. तालुक्यात एकूण ७५.५९ टक्के मतदान झाले असून तब्बल २ लाख २८ हजार ११३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शिरूर तालुक्यातील सात जिल्हा परिषद गटांमध्ये झालेल्या या मतदानात १ लाख १८ हजार ६८५ पुरुष, १ लाख ९ हजार ४२२ महिला तसेच ६ तृतीयपंथीय मतदारांचा सहभाग नोंदविण्यात आला. ग्रामीण…
कान्हूर मेसाई | (सुनिल जिते) शिरूर तालुक्यातील संवेदनशील मानल्या जाणाऱ्या रांजणगाव गणपती गटात सुरू असलेल्या ‘काटे की टक्कर’ लढतीत प्रत्येक मताला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत स्वतःच्या लग्नाच्या दिवशीही ‘आधी मतदान, मग लग्न’ असा निर्धार करत कान्हूर मेसाई येथील नवरदेव गणेश खर्डे यांनी मतदानाचा हक्क बजावला. आज शनिवारी ( दि.७फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता त्यांचे लग्न असतानाही आणि घरात लगीनघाई सुरू असतानाही, त्यांनी वेळ काढून प्रथम घटनेने दिलेला मतदानाचा अधिकार वापरण्याचा निर्णय घेतला. लग्नासाठी शेरवानी परिधान करून ते थेट कान्हूर मेसाई येथील जिल्हा परिषद शाळेतील मतदान केंद्रावर पोहोचले आणि मतदान केले. रांजणगाव गटातील निवडणूक अत्यंत चुरशीची असल्याने एका-एका मताचा हिशोब लावला…
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) मोबाईल फोनने आज मानवी जीवनात क्रांती घडवून आणली असली, तरी त्याचा अतिवापर सध्या चिंतेचा विषय बनत चालला आहे. गावा- गावांमध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वच घटक मोठ्या प्रमाणावर मोबाईलमध्ये गुंतलेले दिसून येत आहेत. घरात असो वा बाहेर, शेतात काम करताना असो वा दुकानात बसताना, प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसून येत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे. पूर्वी गावातील चौक, मंदिर परिसर, चावडी, बसस्थानक, बाजारपेठ अशा ठिकाणी नागरिक एकत्र येऊन विविध विषयांवर चर्चा करत असत. सामाजिक, राजकीय, शेतीविषयक तसेच कौटुंबिक प्रश्नांवर मुक्तपणे संवाद होत असे. मात्र आता या ठिकाणी बसलेली टोळकीही एकमेकांशी संवाद न साधता…
शिरूर | बापू जाधव आपल्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणाऱ्या लोकनेते अजितदादा पवार यांना नियतीची दृष्ट लागली. महाराष्ट्राला हेवा वाटावा अशी विकासकामे आपल्या भागात केवळ अजितदादांमुळेच झाली, ही जाणीव प्रत्येक नागरिकाने ठेवावी. येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये फक्त घड्याळ या चिन्हापुढील बटण दाबून अजितदादांचा विचार जिवंत ठेवण्याचे ऐतिहासिक काम करा, असे आवाहन लोकनेते आर. बी. जगदाळे पाटील यांनी केले. शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. न्हावरे व शिरूर ग्रामीण पंचायत समिती गणातील प्रत्येक गावात शेकडो कार्यकर्त्यांचा फौजफाटा घेऊन आर. बी. जगदाळे पाटील यांनी दौरे काढत संपूर्ण परिसरात राजकीय वातावरण ढवळून काढले आहे. अजितदादा पवार यांच्या दुर्दैवी…
कान्हूर मेसाई, ता.०३:( सुनिल जिते ) राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विकासाच्या संकल्पनेला अभिप्रेत असलेला रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गट नागरिकांची समस्या सोडवून प्रगतीपथावर आणून त्याचा कायापालट करणार असल्याचे आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी दिले आहे. रांजणगाव कारेगाव मुळ जिल्हा परिषद गटात अंतर्गत रस्ते, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, जिल्हा परिषदेच्या शाळा, आरोग्य केंद्रे, तसेच सर्व सामान्य नागरिकांना व शेतकरी बंधूंना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन रांजणगाव जिल्हा परिषद गट प्रगतीपथावर आणणार असल्याचे आश्वासन सामान्य मतदार बंधू भगिनींना ज्योती पाचुंदकर यांनी दिले आहे. शिरूर आंबेगावचे भाग्यविधाते आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव कारेगाव…
शिरूर दि. ०२ (प्रतिनिधी ) टाकळी हाजी ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जुन्या कोंडवाड्याच्या जमिनीवर माजी आमदार पोपटराव हरिभाऊ गावडे यांच्या खाजगी संस्थेने बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, सिटी सर्वे नोंदी करताना केवळ संस्थेचेच नव्हे तर संस्थेच्या नावानंतर पोपटराव हरिभाऊ गावडे असे स्वतःचे वैयक्तिक नावही जोडण्यात आले होते. हा प्रकार प्रशासनाने सत्तेचा गैरवापर, अधिकाराबाहेरील निर्णय आणि कागदोपत्री फेरफार असा ठरवत तब्बल ४० वर्षांनंतर संबंधित बेकायदेशीर नोंद रद्द केली आहे. ग्रामपंचायतची जमीन, पण नोंद माजी आमदारांच्या नावावर…. मौजे टाकळी हाजी येथील ही जमीन सन १९५२- ५३ पासून १९८५- ८६ पर्यंत सलगपणे ग्रामपंचायत टाकळी हाजीच्या…
शिरूर | (अरुणकुमार मोटे) पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) व गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामासाठी असलेल्या अहिला उर्फ भाग्यश्री व राजू जाधव या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याने भाग्यश्री ही मानसिक त्रासाला कंटाळली होती. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
कवठे येमाई | कवठे येमाई (ता. शिरूर) येथील उस्मान शामीर पिंजारी (वय ७०) हे ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी ( दि. ३०) घराबाहेर गेलेले उस्मान पिंजारी दोन दिवस घरी परतलेले नाहीत. घरातील कुणालाही न सांगता ते दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. ते पिशवी घेऊन घराबाहेर गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा अकबर पिंजारी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार उस्मान पिंजारी यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन किंवा टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक फौजदार…
शिरूर ता.०१(सुनिल जिते): उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार (ता.०१) शिरूर येथे शोकसभा पार पडली.शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून शिरूरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर गटसचिवाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद व वेदनादायक आहे. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राने एका संवेदनशील नेत्यास गमावले असून सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,’ अशी शिरूर तालुक्यातील संस्थेच्या विविध कार्यकारी सोसायटीत काम करणाऱ्या सचिवांनी भावना व्यक्त केली आहे. ‘अजितदादा हे सहकार चळवळीशी जोडलेले होते. सहकारी साखर कारखाने, बँका,…

