शिरूर, दि. १३ (अरुणकुमार मोटे) शिरूर येथील श्री स्वामी विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय झाल्याचा आरोप विद्यार्थिनीने केल्यानंतर या प्रकरणाची तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली होती. दरम्यान, महाविद्यालय व्यवस्थापनाने या आरोपांवर सविस्तर खुलासा करत संबंधित आरोप पूर्णपणे खोटे, निराधार व महाविद्यालयाची प्रतिमा मलिन करण्याच्या उद्देशाने करण्यात आलेले असल्याचे स्पष्ट केले आहे. महाविद्यालय व्यवस्थापनाच्या वतीने शिरूर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ, पुणे ही एक नोंदणीकृत शैक्षणिक संस्था असून तिच्या अंतर्गत आश्रमशाळा व लॉ कॉलेज अशा संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये नियमित शैक्षणिक कार्य सुरू असून शैक्षणिक…
Author: Team Shirur Digital
शिरूर, दि. ११ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस अधिक गंभीर रूप धारण केले असून या प्रकरणातील काही नवीन बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. नागरिकांसह काही पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक झाल्याची चर्चा असताना, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांची भूमिकाही संशयाच्या भोवऱ्यात सापडत असल्याचे चित्र दिसत आहे. या घोटाळ्यात सुमारे ३० पेक्षा अधिक नागरिकांनी कारेगाव पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिले असतानाही अद्याप गुन्हा दाखल न झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये नाराजी आणि संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान, काही सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत “पोलिसांना अनधिकृत भिशी चालवण्यास परवानगी नसताना पोलिसच अशा योजनांना पाठबळ देत असतील…
शिरूर तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा शिरूर–मलठण मार्ग शिरूर सार्वजनिक बांधकाम विभागातील मुजोर आधिकार्याच्या निष्क्रीय कामगिरीमुळे अक्षरशः खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. या अधिकाऱ्याला ठेकेदारांकडून नीट खड्डे सुद्धा बुजून घेता आले नाही. त्याचे कारणही तसेच आहे कारण हा मुजोर अधिकारी पुणे येथे राहत असून त्याचे या ठेकेदारांवर व रस्त्यावर त्यांचे कसलेच लक्ष नाही. सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी आंदोलन करूनही हा रस्ता आजही खड्ड्यांच्या विळख्यात तसाच आहे. डागडुजी केल्यानंतरही हा रस्ता असा खड्डेमय बनलेला आहे हे आपण या फोटोच्या माध्यमातून पाहू शकता. त्यामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अनेक वेळा निधी खर्च झाल्याचा दावा करण्यात आला, डागडुजीची कामे झाल्याचे…
शिरूर, दि. ९ (अरुणकुमार मोटे) शिरूर येथील श्री विवेकानंद लॉ कॉलेजमध्ये परीक्षेदरम्यान गैरप्रकार व विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप करत एका विद्यार्थ्याने शिरूर पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केल्याने शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे. या तक्रारीत परीक्षेच्या काळात काही विद्यार्थ्यांकडून मोबाईलचा वापर करून गैरमार्गाने उत्तरं मिळविणे, तसेच परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचे आरोप करण्यात आले आहेत.दिनांक ४ फेब्रुवारी ते ८फेब्रुवारी या दरम्यान कॉलेजमध्ये अवैधरित्या भ्रष्टाचार करत प्राध्यापक व मॅनेजमेंट स्टाफने विदयार्थ्यांकडून आर्थिक लाच घेऊन प्रथम सेमिस्टरच्या उत्तरपत्रिका परिक्षा वेळेच्या व्यतिरीक्त बोलावून लिहायला देण्यात आल्या आहे.व निकाल पूर्णपणे पक्षपात करून मॅनेज केला गेला आहे. संबंधित प्रकार प्रकार कॉलेजच्या CCTV मध्ये रेकॉर्ड…
शिरूर, दि. ६ (अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात सध्या चर्चेत असलेल्या कथित ‘सुलभ’ भिशी घोटाळ्याने दिवसेंदिवस गंभीर स्वरूप धारण केले असून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. नागरिकांकडून तक्रार अर्ज दाखल होऊनही अद्याप गुन्हा नोंदवला गेलेला नसल्यामुळे पोलिसांच्या भूमिकेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी निष्पक्षपणे होणार का? असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक आणि गुंतवणूकदारांकडून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका महिलेने “सुलभ भिशी”च्या नावाखाली अनेक वर्षांपासून भिशी चालवत असल्याची चर्चा आहे. सुरुवातीच्या काळात लहान रकमा घेऊन वेळेवर परतावा देत विश्वास संपादन करण्यात या महिलेला यश आले. त्यामुळे अनेकांनी तिला विश्वासाने पैसे देण्यास सुरुवात केली.…
शिरूर, दि. ५ : गर्भधारणेपूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रे (लिंग निवडीस प्रतिबंध) कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी) कायद्याअंतर्गत शिरुर तालुक्यातील ढोकसांगवी परिसरातील पाचंगेवस्ती येथील लाइफ केअर रुग्णालयामध्ये गर्भलिंग निदान चाचणी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर आरोग्य विभाग व गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने धडक कारवाई केली. मिळालेल्या माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईत बी.ए.एम.एस शिक्षण घेतलेले डॉ. आकाश मालगुंडे यांच्या रुग्णालयामध्ये पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले. वाघोली पोलीस स्टेशनच्या पोलीस शिपाई प्रतीक्षा पानसरे यांनी रुग्णासोबत जाऊन प्रत्यक्ष सापळा रचला. दलाल नरेंद्र ठाकरे, (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे ) याच्या मार्फत मोबाईल ॲपच्या सहाय्याने विविध रुग्णांची गर्भलिंग निदान तपासणी केल्याचे संयुक्त तपासात…
शिरूर दि. ०५ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात सध्या एकाच चर्चेला उधाण आले आहे. “सुलभ भिसी”च्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या एका महिलेचा कथित कारनामा समोर येत असून, यात बडे पोलिस अधिकारी–कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचेही तब्बल ३० कोटी रुपयांपर्यंत नुकसान झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे. कारेगाव पोलिस स्टेशनमध्ये रोजची हजेरी, पोलिसांशी सलगी, अधूनमधून जेवणावळी, वारंवार भेटीगाठी अशा पद्धतीने संबंधित महिलेने पोलिसांचा विश्वास संपादन केल्याची चर्चा रंगली आहे. “घरच्यासारखी” वागणूक मिळवून तिने आपले जाळे शांतपणे विणले. सुरुवातीला छोट्या रकमा, वेळेवर परतावा आणि आकर्षक व्याजदर यामुळे अनेकांचा तिच्यावर विश्वास बसला. हळूहळू “सुलभ भिसी”च्या माध्यमातून मोठ्या रकमा जमा होऊ लागल्या. पोलिसांमध्ये गुंतवणूक सुरू असल्याचे…
शिरूर दि. ०४ ( अरुणकुमार मोटे) शिरूर ते मलठण दरम्यानचा मुख्य मार्ग गेल्या काही वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिला आहे. तालुक्यातील दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा रस्ता आजही खड्डेमय अवस्थेत असल्याने वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. कोंढण ओढ्याच्या जवळ रस्ता अतिशय खराब झाल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत आहे.अनेक वेळा डागडुजी करण्यात आली, निधी खर्च झाल्याचे सांगण्यात आले; मात्र निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्त्याची परिस्थिती “जैसे थे”च राहिली आहे. स्थानिक नागरिकांच्या मते, पावसाळा सुरू झाला की या रस्त्यावरील खड्ड्यांचे प्रमाण दुपटीने वाढते. काही ठिकाणी डांबर पूर्णपणे उखडून गेले असून मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत. दुचाकीस्वारांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत…
शिरूर दि. ०४ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यात भिसी (चिट फंड) योजनेच्या नावाखाली महिला व पुरुष पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांकडून विश्वास संपादन करून लाखो रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात काही पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनीही पैसे गुंतवल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस दलातही याची बऱ्याच दिवसापासून मोठी कुजबुज सुरू आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरूर तालुक्यातील एका महिलेने काही दिवसांपुर्वी विश्वास संपादन करून “विश्वासार्ह भिसी योजना” सुरू केल्याचे सांगत अनेक पोलिस कर्मचाऱ्यांना आकर्षित केले. नियमित मासिक हप्त्यांच्या स्वरूपात रक्कम जमा करून ठराविक कालावधीनंतर मोठी रक्कम परत…
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे) सभासदांच्या हितासाठी विविध कल्याणकारी योजना राबविणाऱ्या बाबासाहेब कवाद निघोज नागरी सहकारी पतसंस्थेने अपघाती विमा योजनेतून पुन्हा एकदा सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेच्या सभासद स्वर्गीय वंदना कैलास घोडे (रा. टाकळी हाजी, ता. शिरूर) यांचा पाबळ येथे मोटारसायकल अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला होता. पतसंस्थेने सर्व सभासदांचा प्रत्येकी एक लाख रुपयांपर्यंतचा अपघाती विमा उतरविला असून, त्याअंतर्गत स्वर्गीय घोडे यांच्या वारसांना विमा दावा मंजूर करून देण्यात यश आले. या माध्यमातून स्वर्गीय वंदना घोडे यांचे वारसदार दत्तात्रय कैलास घोडे यांना १ लाख रुपयांचा धनादेश संस्थेचे अध्यक्ष वसंत कवाद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी उपाध्यक्ष नामदेव थोरात, संचालक चंद्रकांत लामखडे,…

