शिरूर दि. १४ : ( अरुणकुमार मोटे) कायद्याचे रक्षण करणाऱ्या शिरूर पोलीस ठाण्याच्या आवारातच दि. १३ च्या मध्यरात्री गोंधळ, दगडफेक आणि मारामारीचे थरारक चित्र घडले यामुळे शिरूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पोलीस स्टेशनच्या आवारातच दोन गट आमनेसामने येत एकमेकांवर हल्ले करत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच ठाणे अमंलदार कक्षातीत काही वस्तुंची तोडफोड झाल्याची माहीती सुत्रांनी दिली आहे. शिरूर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यानुसार, दि.१३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान शिरूर पोलीस स्टेशनच्या आवारात आणि पुणे अहिल्यानगर महामार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर हा संपूर्ण प्रकार घडला. सुरुवातीला तक्रार नोंदविण्यासाठी आलेल्या दोन्ही गटांमध्ये वादावादी…
Author: Team Shirur Digital
शिरूर, ता. ७ ( अरुणकुमार मोटे ) आई ही मायेचा सागर मानली जाते; मात्र शिरूर तालुक्यातील भांबर्डे येथे घडलेल्या एका अमानुष घटनेने या नात्यालाच काळिमा फासला आहे. अवघ्या अकरा महिन्यांच्या निष्पाप बाळाचा खून स्वतःच्या आईनेच केल्याचे उघड झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. सतत रडत असल्याच्या कारणावरून व दुसरे लग्न करण्यासाठी मुलाचा अडथळा निर्माण होत असल्याने आईनेच आपल्या चिमुकल्याचा जीव घेतल्याची कबुली पोलिस तपासात समोर आली असून, या घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. यश रवींद्र पवार असे मृत बालकाचे नाव आहे. या प्रकरणी वडील रवींद्र अशोक पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आई पूजा रवींद्र पवार हिला रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी (ता.…
टाकळी हाजी | प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील भैरवनाथवाडी येथे भैरवनाथ यात्रा उत्सव बुधवारी (दि.१) मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.सकाळी अभिषेक, हळद समारंभ, मांडव डहाळे, होमहवन व काठी उभारण्याचे धार्मिक विधी पार पडले. सायंकाळी काठी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत उत्सवाला रंगत आणली. रात्री हभप गणेश महाराज वाघमारे यांचे कीर्तन झाले. कीर्तनात त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या विचारांवर प्रकाश टाकत, समाजात एकोपा व समतेचा संदेश दिला. संतांनी कधीही जातपात मानली नाही. आज प्रत्येक समाजाच्या घरात ज्ञानेश्वर महाराजांची पूजा होते,असे सांगत त्यांनी भक्तीचा खरा अर्थ स्पष्ट केला. सज्जनांनी एकत्र येणे ही काळाची गरज असल्याचेही…
टाकळी हाजी : प्रतिनिधी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील थोरात परिवारातील सून श्रद्धा अक्षय थोरात यांची मंडळ कृषि अधिकारी पदावर निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतून येत श्रद्धा यांनी जिद्द, चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यासाच्या जोरावर हे यश मिळवले. विवाहानंतर अनेकदा मुलींच्या शिक्षणात खंड पडतो; मात्र थोरात कुटुंबाने याला अपवाद ठरवत श्रद्धा यांना पूर्ण पाठबळ दिले. शेतकरी कुटुंबातील सर्व सदस्यांनी घरगुती जबाबदाऱ्या सांभाळत त्यांच्या अभ्यासात कोणताही अडथळा येऊ दिला नाही. श्रद्धा थोरात यांच्या यशामुळे टाकळी हाजी परिसरातील मुलींना स्पर्धा परीक्षांकडे वळण्याची प्रेरणा मिळाली आहे. त्यांच्या…
शिरूर : प्रतिनिधी वनपरिमंडळ अधिकारी कार्यालय, शिरूर यांच्या वतीने शनिवार (दि. २१ मार्च २०२६) रोजी ‘वन अग्निमुक्त दिन’ साजरा करण्यात येणार असून, यानिमित्ताने शपथविधी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दुपारी १२ वाजता श्री रामलिंग देवस्थान सभागृह, पाबळ रोड , रामलिंग (शिरूर) येथे पार पडणार आहे. या कार्यक्रमासाठी वन सीमेवरील सर्व गावांतील ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे सदस्य, लोकप्रतिनिधी, तंटामुक्त समितीचे पदाधिकारी तसेच पोलीस पाटील यांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वन अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा सामूहिक शपथविधी कार्यक्रम होणार आहे. वनपरिमंडळ अधिकारी श्री. भानुदास शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, वने ही पाणी, माती, हवामान…
शिरूर | प्रतिनिधी टाकळी हाजी परिसरात सायंकाळी ६ ते रात्री १० या वेळेत होत असलेल्या लोडशेडिंगमुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, या जाचक वीज कपातीविरोधात ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार दिलीप वळसे पाटील यांना निवेदन देण्यात आले. महावितरणकडून १८ मार्च २०२६ पासून नवीन वीजपुरवठा वेळापत्रक लागू करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार सायंकाळच्या वेळेत वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी, महिला तसेच शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत. सायंकाळची वेळ ही विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाची असताना अंधारामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच घरगुती कामांच्या वेळेत वीज नसल्याने महिलांना अंधारात काम करावे लागत आहे. दुसरीकडे, दिवसा वीजपुरवठा नसल्यामुळे शेतीची कामे ठप्प…
जांबुत, (प्रफुल्ल बोंबे) दि. १७— शैक्षणिक वर्ष २०२५— २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये पिंपरखेड (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची इयत्ता पाचवीची विद्यार्थीनी सौम्या सुनिल वरे हिची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली आहे. तिच्या या यशाबद्दल तिचे परिसरातून अभिनंदन करण्यात येत असुन १५ डिसेंबर २०२५ रोजी झालेल्या या परीक्षेत सौम्याने उत्तम यश संपादन करून जिल्ह्यात शाळेचा नावलौकिक वाढविला असून तिच्या या यशामागे मुख्याध्यापक पी. सी. बारहाते, वर्गशिक्षक लहू गाजरे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दरवर्षी भारत सरकारकडून घेण्यात येणाऱ्या या परीक्षेस हजारो विद्यार्थी सहभागी होऊन हि परीक्षा देत असतात. यामध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सहावी ते…
बिबट्यांच्या भीतीमुळे दिवसा वीजपुरवठ्याची मागणी; लोडशेडिंग वेळेत बदलाचीही मागणी टाकळी हाजी : प्रतिनिधी टाकळी हाजी (ता. शिरूर) परिसर हा बिबट प्रवण क्षेत्रात येत असल्याने येथील शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. शेतीसाठी दिवसा थ्री फेज वीजपुरवठा सुरू ठेवावा तसेच सायंकाळच्या लोडशेडिंगच्या वेळेत बदल करावा, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने महावितरणकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. शासनाने यापूर्वी शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा विचार करून दिवसा थ्री फेज वीजपुरवठा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे शेतकरी सुरक्षितपणे शेतीची कामे करू शकत होते. मात्र, मागील काही दिवसांपासून कृषी पंपासाठी वीजपुरवठा दिवसा आणि रात्री अशा दोन शिफ्टमध्ये करण्यात येत आहे. परिणामी, शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी बिबट्यांच्या भीतीखाली शेतात जावे…
शिरूर, दि. १८ ( अरुणकुमार मोटे) शिरूर तालुक्यातील दहिवडी परिसर पुन्हा एकदा हादरला आहे. मांजरेवस्ती येथे १२ वर्षीय साईराज गणेश मांजरे याचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह उसाच्या फडात आढळल्याने संपूर्ण परिसरात भीती, संताप आणि संशयाचे गडद सावट पसरले आहे. विशेष म्हणजे, याच ठिकाणी दोन वर्षांपूर्वी अशाच प्रकारे एका चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे ही केवळ दुर्घटना नसून काहीतरी गंभीर रहस्य दडले आहे का, असा प्रश्न आता सर्वत्र उपस्थित होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, साईराज हा तळेगाव ढमढेरे येथील राय कुमार गुजर प्रशालेत इयत्ता सहावीत शिक्षण घेत होता. आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेला साईराज मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून बेपत्ता होता.…
शिरूर : प्रतिनिधी शिरूर येथील दिग्दर्शक, लेखक व निर्माते रामदास राऊत यांनी २०२० साली तृप्ती फिल्म प्रोडक्शनची स्थापना करून ग्रामीण व शहरी भागातील नवोदित कलाकारांना मोठा मंच उपलब्ध करून दिला आहे. विशेष म्हणजे तमाशा कलावंत, नाट्य कलाकार, रील्स कलाकार तसेच इतर नवोदितांना कोणत्याही प्रकारची ऑडिशन प्रक्रिया न ठेवता आपल्या चित्रपटांमध्ये संधी देण्याचे काम त्यांनी केले आहे. तृप्ती टीम प्रोडक्शनचे आजपर्यंत सुमारे २०० हून अधिक लघुचित्रपट प्रदर्शित झाले असून या माध्यमातून अनेक नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी मिळाली आहे. ग्रामीण भागातील हसवणाऱ्या कलेला व्यासपीठ देण्याचे महत्त्वाचे काम राऊत करत असल्याने त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली जात आहे. बालपणापासूनच कलेची आवड असल्याने राऊत…

