शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध शिरूर | (सुनिल जिते) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह शिरूर तालुक्यात शोककळा पसरली असून, या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १) शिरूर येथे सहकार क्षेत्रातील सचिवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला व जनतेसाठी अखंड झटणारा लोकनेता हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राची अपूरणीय हानी झाली असून, संवेदनशील नेतृत्वाचा आधार हरपल्याचे मत विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये कार्यरत सचिवांनी व्यक्त केले. अजितदादा पवार हे सहकार चळवळीशी अतूट नाते जपणारे नेते होते.…
Author: Team Shirur Digital
शिरूर दि. २९ ( अरुणकुमार मोटे) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील १२जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी यापूर्वी ५फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुधारित कार्यक्रमानुसार आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली…
अजितदादा पवार : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व शिरूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दामूशेठ घोडे यांना शोक अनावर झाला. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक नेतृत्व आणि हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना दामू घोडे यांनी व्यक्त केल्या. या दुःखद प्रसंगी दामू घोडे यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रती त्यांनी मनःपूर्वक…
शिरूर दि. २८( अरुणकुमार मोटे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज (बुधवार) सकाळी बारामतीजवळ अपघात झाला असून, या विमान अपघातात अजित पवार (वय ६६) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांचा राज्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत कायम राहिले होते. अजितत पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल…
सविंदणे–कवठे येमाई रस्ता मृत्यूच्या वाटेवर; निधी नसतानाही काम सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ शिरूर दि. २७ (अरुणकुमार मोटे) सविंदणे ते कवठे येमाई हा सुमारे ५ किलोमीटरचा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत टाकून दिल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. खडीकरण करून रस्ता तसाच सोडण्यात आल्याने आज हा रस्ता विकासाचा नव्हे तर अपघातांचा मार्ग ठरत आहे.या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व शालेय वाहने प्रवास करतात. मात्र खडी उखडलेली, ठिकठिकाणी खोलगट खड्डे, उडणारी दगडधोंडे यामुळे वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी…
शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे) चोरट्यांनी आता देवाच्याच दारात चोऱ्या करण सुरु केल असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे! पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री सोमेश्वर मंदिरात चोरट्यांनी थेट दानपेटीच लांबवल्याची धक्कादायक घटना( दि. २३ ) रोजी समोर आली असून चार दिवस उलटूनही न कारेगाव -रांजनगाव एमआयडीसी पोलिसांना अद्याप या चोरट्यांना गजाआड करता आले नाही. भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या मंदिरातच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनीपरिसरात प्रवेश करत थेट गर्भगृहाजवळ ठेवलेली दानपेटी उचलून नेली. ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…
घोडनदी (ता. शिरूर) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे भव्य उद्घाटन शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे) घोडनदी(ता. शिरूर ) येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व वरिष्ठ दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मा. ना. न्यायमूर्ती संदीप मारणे व अरिफ डॉक्टर यांच्या शुभहस्ते आज संपन्न झाले. या ऐतिहासिक प्रसंगी न्यायव्यवस्थेतील मान्यवर, वकील बांधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक घोडनदी वकील संघटनेचे अध्यक्ष अॅड. उदय सरोदे यांनी केले. यावेळी मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी सांगितले की, शिरूर ते पुणे हे अंतर लक्षात घेता अतिशय वर्दळीचा मार्ग असून पक्षकारांना न्यायालयीन कामकाजासाठी मोठा…
रिक्षाचालक ते नगरसेवक व आता सार्वजनिक बांधकाम समिती सभापती,सुनिल जाधव यांचा संघर्षातून नेतृत्वापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास… शिरूर, दि. २४ ( अरुणकुमार मोटे) शिरूर नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ मधून सामान्य रिक्षाचालक ते नगरसेवक आणि पुढे सार्वजनिक बांधकाम समितीचे सभापती असा थक्क करणारा प्रवास करत सुनिल शंकरराव जाधव यांनी शिरूरच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात आपली ठळक छाप उमटवली आहे. कष्ट, प्रामाणिकपणा आणि लोकांशी थेट संवाद या बळावर त्यांनी उभा केलेला हा प्रवास आज अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सामान्य कुटुंबात जन्मलेले सुनिल जाधव हे श्रमिक वर्गातील प्रतिनिधी म्हणून ओळखले जातात. रिक्षाचालक म्हणून शहरभर फिरताना त्यांचा थेट संपर्क सर्वसामान्य नागरिकांशी आला. याच अनुभवातून…
शिरूर दि. २४ ( अरुणकुमार मोटे) जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळीत शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी–कवठे येमाई गट सध्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेत असून, या गटातून चार मातब्बर नेत्यांनी तूल्यबळ शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वातावरण अक्षरशः पेटले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत भाजपमध्ये प्रवेश केलेले राजेंद्र पोपटरााव गावडे आणि त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी दामूआण्णा घोडे, बाळासाहेब डांगे व डॉ. सुभाष पोकळे यांच्यात थेट प्रतिष्ठेची लढत उभी ठाकली आहे. चारही उमेदवारांच्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान बेट भागातील शेकडो कार्यकर्ते, युवक, महिला व ग्रामस्थ रस्त्यावर उतरल्याने शिरूर शहरासह परिसरात दिवसभर वाहनांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. दुचाकी-चारचाकी ताफे, फटाके, घोषणाबाजी आणि शक्तीप्रदर्शनामुळे ही…
दामू अण्णांना झेडपीपर्यंत नेण्याचा संकल्प शिरूर | प्रतिनिधी “होतील की नाही?” म्हणता म्हणता अखेर जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांचा बिगुल वाजला आणि तब्बल आठ वर्षांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे गावागावात नवचैतन्य संचारले आहे. सत्तेच्या केंद्रस्थानी पोहोचण्यासाठी झेडपीची पायरी चढणे हे प्रत्येक नेतृत्वाचे स्वप्न असते. मात्र, हे स्वप्न आता केवळ नेत्याचे न राहता बेट भागातील सामान्य माणसाचे सामूहिक ध्येय बनले आहे. बेट भागासह संपूर्ण शिरूर तालुका, आंबेगाव व जुन्नर परिसर ज्या नेतृत्वाच्या प्रेमात पडला आहे, ते नाव म्हणजे — टाकळी हाजीचे भाग्यविधाते दामू अण्णा घोडे. आजच्या पैशांच्या राजकारणात धनदांडग्यांच्या बळावर सत्ता हस्तगत करण्याची स्पर्धा सुरू असताना, पैशाच्या जोरावर नव्हे तर…

