शिरूर दि. ०२ (प्रतिनिधी ) टाकळी हाजी ता. शिरूर येथील ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जुन्या कोंडवाड्याच्या जमिनीवर माजी आमदार पोपटराव हरिभाऊ गावडे यांच्या खाजगी संस्थेने बेकायदेशीरपणे कब्जा करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, सिटी सर्वे नोंदी करताना केवळ संस्थेचेच नव्हे तर संस्थेच्या नावानंतर पोपटराव हरिभाऊ गावडे असे स्वतःचे वैयक्तिक नावही जोडण्यात आले होते. हा प्रकार प्रशासनाने सत्तेचा गैरवापर, अधिकाराबाहेरील निर्णय आणि कागदोपत्री फेरफार असा ठरवत तब्बल ४० वर्षांनंतर संबंधित बेकायदेशीर नोंद रद्द केली आहे. ग्रामपंचायतची जमीन, पण नोंद माजी आमदारांच्या नावावर…. मौजे टाकळी हाजी येथील ही जमीन सन १९५२- ५३ पासून १९८५- ८६ पर्यंत सलगपणे ग्रामपंचायत टाकळी हाजीच्या…
Author: Team Shirur Digital
शिरूर | (अरुणकुमार मोटे) पाबळ (ता. शिरूर) येथे पतीकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी महिलेच्या पतीविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. राजू पांडुरंग जाधव असे आरोपी पतीचे नाव असून अहिला उर्फ भाग्यश्री राजू जाधव (वय ३०), सार्थक राजू जाधव (वय ६) व गौरी राजू जाधव (वय ४ महिने) अशी मृतांची नावे आहेत. पाबळ येथील एका वीटभट्टीवर कामासाठी असलेल्या अहिला उर्फ भाग्यश्री व राजू जाधव या दाम्पत्यामध्ये वारंवार वाद होत असल्याने भाग्यश्री ही मानसिक त्रासाला कंटाळली होती. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…
कवठे येमाई | कवठे येमाई (ता. शिरूर) येथील उस्मान शामीर पिंजारी (वय ७०) हे ज्येष्ठ नागरिक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. शुक्रवारी ( दि. ३०) घराबाहेर गेलेले उस्मान पिंजारी दोन दिवस घरी परतलेले नाहीत. घरातील कुणालाही न सांगता ते दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले. ते पिशवी घेऊन घराबाहेर गेले असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी त्यांचा मुलगा अकबर पिंजारी यांनी शिरूर पोलीस ठाण्यात वडील बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार उस्मान पिंजारी यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.सदर व्यक्ती कोणाला आढळल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशन किंवा टाकळी हाजी पोलीस दूरक्षेत्राशी संपर्क साधावा, असे आवाहन सहायक फौजदार…
शिरूर ता.०१(सुनिल जिते): उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली वाहण्यासाठी रविवार (ता.०१) शिरूर येथे शोकसभा पार पडली.शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्राने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला आणि जनतेसाठी अखंड झटणारा नेता गमावला असून शिरूरसाठी ही हानी असल्याची भावना शिरूर गटसचिवाच्या वतीने व्यक्त करण्यात आली. अजित पवार यांचे निधन अत्यंत दुःखद व वेदनादायक आहे. त्यांच्या निधनामुळे सहकार क्षेत्राने एका संवेदनशील नेत्यास गमावले असून सहकार क्षेत्राची मोठी हानी झाली आहे,’ अशी शिरूर तालुक्यातील संस्थेच्या विविध कार्यकारी सोसायटीत काम करणाऱ्या सचिवांनी भावना व्यक्त केली आहे. ‘अजितदादा हे सहकार चळवळीशी जोडलेले होते. सहकारी साखर कारखाने, बँका,…
शोकसभेत आठवणींच्या भावनांचा फुटला बांध शिरूर | (सुनिल जिते) उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण महाराष्ट्रासह शिरूर तालुक्यात शोककळा पसरली असून, या दु:खद घटनेच्या पार्श्वभूमीवर रविवारी (ता. १) शिरूर येथे सहकार क्षेत्रातील सचिवांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती. शिरूरच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार असलेल्या अजित पवार यांच्या निधनाने एक कर्तबगार, दूरदृष्टी असलेला व जनतेसाठी अखंड झटणारा लोकनेता हरपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यांच्या जाण्याने सहकार क्षेत्राची अपूरणीय हानी झाली असून, संवेदनशील नेतृत्वाचा आधार हरपल्याचे मत विविध कार्यकारी सोसायट्यांमध्ये कार्यरत सचिवांनी व्यक्त केले. अजितदादा पवार हे सहकार चळवळीशी अतूट नाते जपणारे नेते होते.…
शिरूर दि. २९ ( अरुणकुमार मोटे) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला असून, त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील १२जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी यापूर्वी ५फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान आणि ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी निश्चित करण्यात आली होती. मात्र, सुधारित कार्यक्रमानुसार आता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान तर ९ फेब्रुवारी २०२६ रोजी मतमोजणी होणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली…
अजितदादा पवार : महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व शिरूर | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाची दुःखद बातमी समजताच टाकळी हाजी–कवठे येमाई जिल्हा परिषद गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दामूशेठ घोडे यांना शोक अनावर झाला. अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आधारस्तंभ, मार्गदर्शक नेतृत्व आणि हजारो कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात न भरून येणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशा भावना दामू घोडे यांनी व्यक्त केल्या. या दुःखद प्रसंगी दामू घोडे यांनी अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांप्रती त्यांनी मनःपूर्वक…
शिरूर दि. २८( अरुणकुमार मोटे) राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला आज (बुधवार) सकाळी बारामतीजवळ अपघात झाला असून, या विमान अपघातात अजित पवार (वय ६६) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार यांचा राज्याच्या राजकारणात गेल्या ४० वर्षांपासून वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत कायम राहिले होते. अजितत पवार यांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर असताना ही घटना घडली. जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज बारामतीमध्ये दाखल…
सविंदणे–कवठे येमाई रस्ता मृत्यूच्या वाटेवर; निधी नसतानाही काम सुरू करून नागरिकांच्या जीवाशी खेळ शिरूर दि. २७ (अरुणकुमार मोटे) सविंदणे ते कवठे येमाई हा सुमारे ५ किलोमीटरचा महत्त्वाचा ग्रामीण रस्ता गेल्या ७ ते ८ महिन्यांपासून अर्धवट अवस्थेत टाकून दिल्याने परिसरातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व वाहनचालक अक्षरशः हैराण झाले आहेत. खडीकरण करून रस्ता तसाच सोडण्यात आल्याने आज हा रस्ता विकासाचा नव्हे तर अपघातांचा मार्ग ठरत आहे.या रस्त्यावरून दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर व शालेय वाहने प्रवास करतात. मात्र खडी उखडलेली, ठिकठिकाणी खोलगट खड्डे, उडणारी दगडधोंडे यामुळे वाहन चालवणे म्हणजे जीव मुठीत धरून प्रवास करण्यासारखे झाले आहे. या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी…
शिरूर दि. २७ ( अरुणकुमार मोटे) चोरट्यांनी आता देवाच्याच दारात चोऱ्या करण सुरु केल असून या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ होऊ लागली आहे! पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री सोमेश्वर मंदिरात चोरट्यांनी थेट दानपेटीच लांबवल्याची धक्कादायक घटना( दि. २३ ) रोजी समोर आली असून चार दिवस उलटूनही न कारेगाव -रांजनगाव एमआयडीसी पोलिसांना अद्याप या चोरट्यांना गजाआड करता आले नाही. भाविकांच्या श्रद्धेचं केंद्र असलेल्या मंदिरातच चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २३ च्या रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनीपरिसरात प्रवेश करत थेट गर्भगृहाजवळ ठेवलेली दानपेटी उचलून नेली. ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली…

