जांबुत : प्रफुल्ल बोंबे | दि. १६ महानगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीनंतर आता राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजू लागले आहे. पुणे जिल्ह्याचे विशेष लक्ष लागलेल्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई–टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात अटीतटीच्या पंचरंगी लढतीचे संकेत स्पष्ट होत असून, इच्छुक उमेदवारांनी पक्षांतर्गत हालचाली वाढवत प्रचाराला सुरुवात केली आहे. या गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), भाजप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तसेच अन्य घटकांमुळे लढत अधिकच रंगतदार झाली आहे. अनेक निवडणुकांमध्ये शांत भूमिका घेतलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला कवठे येमाई येथील एका उद्योजकाच्या पक्षप्रवेशामुळे बळकटी मिळाली असली, तरी जनतेचा कौल कुणाच्या पारड्यात…
Author: Team Shirur Digital
शिरूर दि.१५ ( अरुणकुमार मोटे) : सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर व वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनांच्या अनुषंगाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालय शिरूर येथे अचानक भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती , आरोग्य सेवेशी संबंधित अनेक गंभीर व धक्कादायक त्रुटी समोर आल्या आहेत. यामध्ये रुग्णांच्या वापरातील बेडशीट अस्वच्छ व नियमानुसार नसणे,रुग्णालय परिसरात, वॉर्ड व शौचालयांमध्ये स्वच्छतेचा पूर्ण अभाव,ग्रामीण भागासाठी अत्यावश्यक असतानाही रुग्ण भरतीचे प्रमाण संशयास्पदरीत्या कमी,जिल्हा स्तरावरून उपलब्ध असलेली औषधे वेळेवर उचलून रुग्णालयात न आणणे, त्यामुळे रुग्णांना आवश्यक उपचार मिळत नसणे या गंभीर त्रुटींमुळे ग्रामीण व गरीब रुग्णांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत असून, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर…
शिरूर आगाराला १५ हजारांची दणदणीत फटकारणी…, विद्यार्थ्याच्या तक्रारीला न्याय शिरूर दि. १५ ( अरुणकुमार मोटे) | ग्रामीण भागातील प्रवाशांच्या संयमाचा अंत झाला आहे, याचा ठळक पुरावा पुणे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या एका ऐतिहासिक निकालातून समोर आला आहे. पूर्वसूचना न देता बसफेऱ्या रद्द करणे, अर्ध्या मार्गातून बसेस परत आणणे आणि वेळापत्रकाची खुलेआम पायमल्ली करणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या शिरूर आगाराला आयोगाने जोरदार दणका दिला असून विद्यार्थ्याला १५ हजार रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.ही लढाई लढली ती सविंदणे (ता. शिरूर) येथील विद्यार्थी सागर तान्हाजी रोकडे यांनी आणि ती केवळ स्वतःसाठी नव्हे, तर हजारो ग्रामीण प्रवाशांच्या हक्कांसाठी ठरली आहे. सागर रोकडे…
शिरूर दि. १५ ( अरुणकुमार मोटे) | शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर आता उपनगराध्यक्षपदाच्या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शुक्रवारी, १६ जानेवारी रोजी उपनगराध्यक्षपदाची निवडणूक होणार असून, याच दिवशी तीन स्वीकृत नगरसेवकांचीही निवड केली जाणार आहे. त्यामुळे शिरूरच्या स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा रंगली आहे. अलीकडेच पार पडलेल्या नगराध्यक्षपदाच्या पंचरंगी लढतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या उमेदवार ऐश्वर्या अभिजित पाचर्णे यांनी विजय मिळवला. या विजयामुळे शिरूर नगरपालिकेत युवा नेतृत्वाला संधी मिळाल्याचे मानले जात आहे.यंदाच्या नगरपरिषद निवडणुकीत प्रथमच सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी अधिकृत चिन्हांवर निवडणूक लढवली. त्यात भारतीय जनता पक्षाचे ११ नगरसेवक निवडून आले असून सर्वाधिक संख्याबळ भाजपकडे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस…
कान्हूर मेसाई:ता. १४ (सुनिल जिते ) कान्हूर मेसाई (ता.शिरूर) येथील रहिवासी व लष्करातील जवान मनोज कुमार दळवी नुकतेच तीस वर्षांच्या प्रदीर्घ लष्करी सेवेनंतर निवृत्त झाले. त्यानिमित्ताने रविवारी(ता.११) सकाळी गावकऱ्यांनी त्यांची मिरवणूक काढली. मेसाई कार्यालयात झालेल्या भव्य सेवापूर्ती गौरव सोहळ्यात त्यांचा ग्रामस्थांनी कुटुंबियांसह सपत्नीक सत्कारही केला. यावेळी दळवी यांना गहिवरून आले होते. राष्ट्राच्या संरक्षणासाठी आहोरात्र सीमेवर पाहारा देणाऱ्या प्रत्येक सैनिकाबाबत नागरिकांमध्ये कायमच आदराची भावना असते. त्याच्या निवृत्तीनंतरही हा भाव कायम असलेला पाहायला मिळतो. कान्हूर मेसाई येथे निवृत्त होऊन आलेल्या सुभेदार मनोज कुमार दळवी यांच्याबाबत असाच अभिमान बाळगत येथील नागरिकांनी व कुटूंबानी त्यांचा निवृत्ती सोहळा साजरा करून सैनिकांप्रती असलेला आदर व अभिमान…
शिरूर (अरुणकुमार मोटे) | अष्टविनायक महामार्गावरील वाढते अपघात गंभीर चिंतेचा विषय ठरत असून, शिरूर तालुक्यातील कवठे येमाई ते मलठण दरम्यान महामार्ग मृत्यूचा सापळा बनत चालल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. कवठे येमाई येथील रोडेवाडी फाट्याजवळ झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २४ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून, दुसरा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबत राजू श्रीराम गाड्री (वय २८, व्यवसाय आईस्क्रिम विक्री, सध्या रा. फुलाई हॉटेल, कवठे येमाई) यांनी फिर्याद दिली आहे. मृत तरुणाचे नाव किरण देवीनाथ जोगी (वय २४, रा. लादवास, ता. मांडल, जि. भिलवाडा, राजस्थान) असे आहे. सोमवारी (दि.१२) रात्री साडेआठच्या…
शिरूर : (अरुणकुमार मोटे) | शिरूर तालुक्यात सध्या राजकारणाचा एक वेगळाच आणि चिंताजनक प्रवाह दिसून येत आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी देवदर्शनाचे दौरे, हजारोंच्या जेवणावळी, भव्य सांस्कृतिक कार्यक्रम तसेच महागड्या खानावळींचा सपाटा सुरू असून, निवडणूक अद्याप जाहीरही न झाल्याने तालुक्यात आधीच रणधुमाळी सुरू झाल्याचे चित्र आहे. विशेषतः रांजणगाव–कारेगाव जिल्हा परिषद गटात कोट्यवधी रुपयांची उधळण सुरू असून, येथे भावकीतच प्रतिष्ठेची लढाई रंगली आहे. दोन्ही बाजूंनी वारेमाप खर्च केला जात असून, या शक्तिप्रदर्शनाचा आनंद मतदार मात्र घेताना दिसत आहेत. या सर्व कार्यक्रमांचा मूळ उद्देश सेवा, विचारधारा किंवा विकास नसून केवळ शक्ती प्रदर्शन आणि पैशांची ताकद दाखवण्याची स्पर्धा हाच असल्याचे स्पष्टपणे जाणवते. कोण किती…
रामलिंग महिला उन्नती बहु सामाजिक संस्था यांचा वतीने आदर्श माता व आदर्श पत्रकार पुरस्काराने मान्यवरांचा गौरव शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे ) “राजमाता जिजाऊ या केवळ शिवाजी महाराजांच्या माता नव्हत्या, तर स्वराज्याच्या पहिल्या गुरू होत्या. त्यांनी शिवरायांच्या मनात स्वधर्म, स्वराज्य आणि स्वाभिमानाची बीजे रोवली. तसेच स्वामी विवेकानंद यांनीही आदर्श जीवनमूल्यांची शिकवण समाजाला दिली. या दोघांचे ही कार्य महान असून विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार प्रत्यक्ष आचरणात आणावे” असे आवाहन रामलिंग उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणीताई कर्डीले यांनी केले. रांजणगांव येथील मंगलमूर्ती विद्याधाम शाळेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी रामलिंग उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने…
शिरूर दि. १३ ( अरुणकुमार मोटे) अखिल भारतीय मराठा महासंघ यांच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेब यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये सामाजिक कार्यात सातत्याने भरीव योगदान देणाऱ्या रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा राणी कार्डिले यांना ‘आदर्श समाजसेविका पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. या प्रसंगी सुप्रसिद्ध शिवशंभू व्याख्याते श्री. राकेश पिंजन सरकार यांनी “जिजाऊ तुम्ही होतात म्हणून…” या विषयावर अत्यंत प्रेरणादायी व्याख्यान सादर केले. त्यांच्या शब्दांतून राजमाता जिजाऊ साहेबांचे संस्कार, राष्ट्रनिर्मितीतील योगदान आणि मातृत्वाचे महान कार्य प्रभावीपणे उलगडले गेले. उपस्थित श्रोते भारावून गेले होते. कार्यक्रमात आदर्श…
शिरूर दि. १२ ( अरुणकुमार मोटे) । शिरूर तालुक्यातील कवठे यमाई पंचायत समिती गण हा महिला सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव असून २०२६ मध्ये होणाऱ्या पंचायत समिती निवडणुकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला असला, तरी इतर कोणत्याही राजकीय पक्षांकडून अद्याप उमेदवारीची घोषणा झालेली नाही. त्यामुळे राजकीय वातावरणात उत्सुकता आणि संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, सविंदणे गावच्या विद्यमान सरपंच मनीषाताई दत्तात्रय नरवडे यांनी कवठे यमाई पंचायत समिती गणातून निवडणूक लढवावी, अशी जोरदार आणि सर्वपक्षीय मागणी ग्रामस्थांकडून पुढे येत आहे. विशेष म्हणजे ही मागणी कोणत्याही एका पक्षापुरती मर्यादित न राहता…

