Author: Team Shirur Digital

शिरूर दि. ११ ( अरुणकुमार मोटे) शिरूर ग्रामीण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बाबुरावनगर परिसरातील पायाभूत सुविधांची अक्षरशः वाताहत झाली असून रस्त्यांची अपूर्ण कामे, तुंबलेल्या गटार लाईन्स आणि विस्कळीत पाणीपुरवठा यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गंगा पेट्रोल पंपामागील टॉवर लाईन रस्त्याचे काम तीन महिन्यांपूर्वी मुरुमीकरण करून अर्धवट अवस्थेत सोडण्यात आले आहे. परिणामी या रस्त्यावरून खडी क्रेशरचे अवजड डंपर सातत्याने ये-जा करत असून संपूर्ण परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, वृद्ध आणि श्वसनाचे आजार असणाऱ्या रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे…

Read More